सालाबादाप्रमाणे दर वर्षी दसर्याचे तोरण
यावर्षी सुद्धा बांधून सणांची सुरुवात करण्याचे ठरविले . गडवाट
परिवारातर्फे दरवर्षी सह्याद्री मधील दुर्गांवर महाराष्ट्रातील विविध
भागांमधून तोरण बांधायचा उपक्रम आयोजित करण्यात येतो त्याअंतर्गत यंदा
जळगाव-धुळे विभाग मिळून किल्ले कंक्राळा येथे तोरण बांधायचे आम्ही
ठरविले. दसर्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या मित्र मंगेश बाविस्कर याच्या
घरी धुळ्यात मुक्काम ठोकला. दुसर्या दिवशी पहाटेच निघायचे ठरविले होते. तसे
नियोजन रात्रीच करून ठेवले. तोरण बांधायला लागणारे झेंडूची फुल सुई दोरा
सुतळी सगळ काही आधीच ब्याग मधे भरून घेतले. सकाळी पहाटेच ५.३० ला मंगेश आणि
मी धुळे-सुरत हायवे ने मालेगाव साठी निघालो. मालेगाव म्हटले म्हणजे नाशिक
जिल्हा. मालेगाव च्या पश्चिम दिशेला सह्याद्री मधील
गाळणा,पिसोळ,डेरमाळ,किंक्राळा सारखे अनेक किल्ले आहेत. यांना दुर्लक्षितच
म्हणता येईल.
धुळ्यामधून किल्ले
कंक्राळा येथे जायचे असल्यास थेट मालेगाव रस्ता गाठावा. मालेगाव च्या
अलीकडेच १३ किलोमीटर ला कंक्राळा नावाचे गाव आहे. बहुदा किल्ल्याच्या
नावावरून गावाचे नाव सुद्धा किंक्राळा पडले असावे. नाशिक मधून या
किल्ल्यासाठी यायचे असल्यास मालेगाव-गाळणा रस्त्यावर करंजगव्हाण नावाचे गाव
लागते. मालेगाव पासून हे गाव २५ किमी आहे. करंजगव्हाण गावापासून एक रस्ता
डावीकडे कंक्राळा या गावासाठी निघतो. करंजगव्हाण पासून कंक्राळा गाव ६ किमी
वर आहे . समोरच गेल्यावर गावाच्या मागील बाजून किल्ला दिसून येतो.
किल्ल्यावर जाण्यासाठी गावातूनच जावे लागते.
किल्ला
चढाई साठी सोपा आहे. पायथ्यापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत
जाण्यास ४५ मिनिट लागतात. चढाई मार्गात बरीच दाट झाडझुडप लागलीत. त्यामुळे
नेमका रस्ता कळून येत नव्हता. थोडे वर चढल्यावर किल्ल्याची पडझड झालेली
तटबंदी दिसून आली. मग लगेचच एका दमात किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ पोहचलो.
प्रवेशद्वार चे सुद्धा नुकसान झाले आहे आणि तिथे बरीच शी झाड आली आहेत.
तिथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच किल्ल्यावर जाऊन पोहचलो . वेळ वाया न
घालविता किल्ला फिरायला सुरुवात केली . किल्ल्यावर तसे काहीच अवशेष दिसून
येत नाहीत. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेव ची पिंड , सोबत नंदी आणि
हनुमानाची शेंदूर फसलेली दिसून येते. बहुतेक किल्ल्यावर शंकराचे मंदिर
असावे. महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. मनुष्यवस्ती आणि गर्दी पासून
दूर असलेल्या या देवांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. वाटले कि हेच खरे
सुखी देवता. ना इथे कुणाचा मानपान ना नवसाच्या रांगा . पुढे उजव्या
बाजूला वर चढून गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर येउन पोहचलो. तिकडे
जाताच समोरच भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या दिसून येतात.
यातल्या २ टाक्या या आकारमानाने खूप मोठ्या आहेत. तिथे थोडावेळ थांबून
आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूस निघालो. डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची
पडलेली तटबंदी दिसून येते . उजव्या बाजूला किल्ल्याला वळसा मारला कि
खालच्या बाजूला किल्ल्याचे प्र वेश्द्वार दिसून येते आणि समोरच्या बसून
डोगरात कोरलेल्या २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात. गावकर्यांनी
चुन्याच्या खुणा त्या टाक्यांच्या बाजून करून ठेवल्या आहेत. गावकरी
सांगतात कि तेथील पाण्याची पातली कधीच कमी होत नाही आणि बारमाही थंडगार
पिण्याचे पाणी तेथे असते. किल्ला उतरताना त्या टाक्यांना भेट देण्याचे
आम्ही ठरविले . नंतर आम्ही परत खाली किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ आलो. आणि
किल्ल्याला बांधायला लागणारे तोरण बांधायला सुरुवात केली . तोरण बांधून
झाल्यावर प्रवेशद्वार समोर आलेली झाड झुडपे मंगेश ने तोडली आणि तोरण
बांधायला जागा मोकळी झाली. तोरण बांधून झाल्यावर शिवनामाचा जयघोष करून
मंगेश ने गारद दिली . कॅमेरा मध्ये फोटो काढून आठवणी कैद केल्या. थोडावेळ
आराम करून किल्ला उतरायला सुरुवात केली. किल्ला उतरत असतांना त्या
पिण्याच्या टाक्या दिसतात तिथे आम्ही गेलो. टाक्यांमधील पाण्याने खरच खूप
सुखद अनुभव दिला. थंडगार पाण्याने मन तृप्त झाले . थोडा वेळ तेथे विसावा
घेऊन गड पुन्हा एकदा निरखून काढला आणि आम्ही गड उतरायला लागलो.
असा हा उर्लाक्षित आणि उपेक्षित असा किंक्राला किल्ला दसरा तोरण निमीन त्ताने कायम आठवणीत राहील









































