Wednesday, November 4, 2015

किल्ले कंक्राळा

सालाबादाप्रमाणे दर वर्षी दसर्याचे तोरण यावर्षी सुद्धा बांधून सणांची सुरुवात करण्याचे ठरविले . गडवाट परिवारातर्फे दरवर्षी सह्याद्री मधील दुर्गांवर महाराष्ट्रातील विविध भागांमधून  तोरण बांधायचा उपक्रम आयोजित करण्यात येतो  त्याअंतर्गत यंदा जळगाव-धुळे विभाग मिळून किल्ले कंक्राळा येथे तोरण बांधायचे आम्ही ठरविले. दसर्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या मित्र मंगेश बाविस्कर याच्या घरी धुळ्यात मुक्काम ठोकला. दुसर्या दिवशी पहाटेच निघायचे ठरविले होते. तसे नियोजन रात्रीच करून ठेवले. तोरण बांधायला लागणारे झेंडूची फुल सुई दोरा सुतळी सगळ काही आधीच ब्याग मधे भरून घेतले. सकाळी पहाटेच ५.३० ला मंगेश आणि मी धुळे-सुरत हायवे ने मालेगाव साठी निघालो. मालेगाव म्हटले म्हणजे नाशिक जिल्हा. मालेगाव च्या पश्चिम दिशेला सह्याद्री मधील गाळणा,पिसोळ,डेरमाळ,किंक्राळा सारखे अनेक किल्ले आहेत. यांना दुर्लक्षितच म्हणता येईल. 
धुळ्यामधून किल्ले कंक्राळा येथे जायचे असल्यास थेट मालेगाव रस्ता गाठावा. मालेगाव च्या अलीकडेच १३ किलोमीटर ला कंक्राळा नावाचे गाव आहे. बहुदा किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव सुद्धा किंक्राळा पडले असावे. नाशिक मधून या किल्ल्यासाठी यायचे असल्यास मालेगाव-गाळणा रस्त्यावर करंजगव्हाण नावाचे गाव लागते. मालेगाव पासून हे गाव २५ किमी आहे. करंजगव्हाण गावापासून एक रस्ता डावीकडे कंक्राळा या गावासाठी निघतो. करंजगव्हाण पासून कंक्राळा गाव ६ किमी वर आहे . समोरच गेल्यावर गावाच्या मागील बाजून किल्ला दिसून येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी गावातूनच जावे लागते. 
किल्ला चढाई साठी सोपा आहे. पायथ्यापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत जाण्यास ४५ मिनिट लागतात. चढाई मार्गात बरीच दाट झाडझुडप लागलीत. त्यामुळे नेमका रस्ता कळून येत नव्हता. थोडे वर चढल्यावर किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी दिसून आली. मग लगेचच एका दमात किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ पोहचलो. प्रवेशद्वार चे सुद्धा नुकसान झाले आहे  आणि तिथे बरीच शी झाड आली आहेत. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच किल्ल्यावर जाऊन पोहचलो . वेळ वाया न घालविता किल्ला फिरायला सुरुवात केली . किल्ल्यावर तसे काहीच अवशेष दिसून येत नाहीत. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेव ची पिंड , सोबत नंदी आणि हनुमानाची शेंदूर फसलेली दिसून येते. बहुतेक किल्ल्यावर शंकराचे मंदिर असावे. महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. मनुष्यवस्ती आणि गर्दी पासून दूर असलेल्या या देवांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. वाटले कि हेच खरे सुखी देवता. ना इथे कुणाचा मानपान ना  नवसाच्या रांगा . पुढे उजव्या बाजूला वर चढून गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर येउन पोहचलो. तिकडे जाताच समोरच भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या दिसून येतात. यातल्या २ टाक्या या आकारमानाने खूप मोठ्या आहेत. तिथे थोडावेळ थांबून आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूस निघालो. डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची पडलेली तटबंदी दिसून येते . उजव्या बाजूला किल्ल्याला वळसा मारला कि खालच्या बाजूला किल्ल्याचे प्र वेश्द्वार दिसून येते आणि समोरच्या बसून डोगरात कोरलेल्या २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात. गावकर्यांनी चुन्याच्या खुणा त्या टाक्यांच्या बाजून करून ठेवल्या आहेत. गावकरी सांगतात कि तेथील पाण्याची पातली कधीच कमी होत नाही आणि बारमाही थंडगार पिण्याचे पाणी तेथे असते. किल्ला उतरताना त्या टाक्यांना भेट देण्याचे आम्ही ठरविले . नंतर आम्ही परत खाली किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ आलो. आणि किल्ल्याला बांधायला लागणारे तोरण बांधायला सुरुवात केली . तोरण बांधून झाल्यावर प्रवेशद्वार समोर आलेली झाड झुडपे मंगेश ने तोडली आणि तोरण बांधायला जागा मोकळी झाली. तोरण बांधून झाल्यावर शिवनामाचा जयघोष करून मंगेश ने गारद दिली . कॅमेरा मध्ये फोटो काढून आठवणी कैद केल्या. थोडावेळ आराम करून किल्ला उतरायला सुरुवात केली. किल्ला उतरत असतांना त्या पिण्याच्या टाक्या दिसतात तिथे आम्ही गेलो. टाक्यांमधील पाण्याने खरच खूप सुखद अनुभव दिला. थंडगार पाण्याने मन तृप्त झाले . थोडा वेळ तेथे विसावा घेऊन गड पुन्हा एकदा निरखून काढला आणि आम्ही गड उतरायला लागलो. 
असा हा उर्लाक्षित आणि उपेक्षित असा किंक्राला किल्ला दसरा तोरण निमीन त्ताने कायम आठवणीत राहील 
अमोल देशमुख
जळगाव
9970398616











दूर्लक्षित किल्ले सुतोंडा

दूर्लक्षित  किल्ले सुतोंडा 
हा एक लहान किल्ला जो
नायगाव चा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो . दि १६ ऑगस्ट ला मी आणि माझा मित्र मंगेश बाविस्कर  पहाटे ५ ला बाईक ने जळगाव वरून निघालो . जळगाव वरून सुतोंदा अंतर अंदाजे २ तास आहे जवळपास ८० किमी . जळगाव वरून पाचोरा होऊन पुढे बनोटी या गावात पोचलो कि सुतोंडा  किल्ला दिसून येतो . किल्ला चढाई ला सोपा आहे . अंदाजे ४५  मिनिट लागतात. बनोटी गावातून पुढे सरकल्यावर एका डोंगरावर  किल्ल्याचा बुरुज दिसून येतो,किल्ल्यावर जातांना  थोडा वळसा घालून जावे लागते . वर चढून गेल्यावर एक भलामोठा खडक फोडून त्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसून येते. दरवाज्यातून आत गेल्यावर भुयारी मार्गाने आपण किल्ल्यावर जाऊन पोहचतो. 

येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज व तटबंदी होती, तर तिसर्‍या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. 

पुढे वर चढून गेल्यावर चारही बाजूने पाण्याच्या टाक्यांचे आणि  लेणींचे थर आहेत व या लेणींचे थरांचाच हा डोंगर आहे. प्रत्येक टाक्याच्या वरची छताची बाजू ही सपाट व मोकळी जागा आढळते. वर उंच डोंगराचा सुळका दिसून येतात . वर टोकांवर दगड रचून केलेल्या भिंती आहेत. किल्ल्यावर असंख्य पिण्याच्या पाण्याच्य टाक्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. किल्ल्यावर बांधकाम केलेल्या इमारतीचे अवशेष सुद्धा दिसून येतात . किल्ल्याच्या उत्तरेस एक चोर दरवाजा दिसून येतो. ज्यामधून तटबंदी पार करून किल्ल्याच्या थेट आत किवा बाहेर प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या तटबंदी ला पकडून फिरत गेल्यास एक टेहाळणी भक्कम बुरुज दिसून येतो. किल्ल्यावर सध्यातरी एवढेच अवशेष दिसून येतात . २-३ तासात   किल्ला आरामात बघून होतो . या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे अखंड दगडात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या आणि दगडी भुयारीप्रवेशद्वार. आज इतके वर्ष होऊन सुद्धा हा किल्ला अजूनही आपले वेगळेपण टिकवून आहे पण काहीसा दुर्लक्षित असा हा किल्ला आहे 
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही . पायथ्याशी असलेल्या बनोटी गावात राहून आपण मुक्काम करू शकतो. पिण्याचे पाणी किल्ल्यावर मुबलक आहे. बारही  महिने किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या फुल असतात . 

किल्ल्यावर जाण्याचा मार्ग 
औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

असा हा किल्ला प्रत्येक इतिहास प्रेमीने एकदा तरी भेट देण्यासारखा आहे .

अमोल देशमुख
जळगाव









Wednesday, June 3, 2015

हरिहर दुर्गभ्रमंती

किल्ले हरिहर दुर्गभ्रमंती- १ चित्तथरारक अनुभव
२०१४ सालचा शेवट हा मला एका कायम लक्ष्यात राहील अश्या दुर्गभ्रमंतीने करायचा होता . बराच विचार केल्यानंतर मी हरिहर किल्ल्याची निवड केली ,गेल्या महिन्यातच आम्ही भास्कर गडावर सह्याद्री स्वच्चता मोहीम राबविली होती , तेवा गडावर जातानाच हरिहर नजरेस पडला होता न कधी तो मी सर करणार असे झाले होते . या आधी सुद्धा हरिहर बद्दल बरेच ऐकून होतो पण जायचं काही जमत नवते . शेवटी ठरवलेच सरत्या वर्षाला निरोप हा हरिहर मोहीम फत्ते करून करायचा . २७-२८ असे २ दिवस मला सुट्टी होती . जायचे नियोजन आधीपासून करून ठेवले होते. २६ ला रात्रीच मी नाशिक गाठले , रात्र मित्राकडे काढली आणि मी अन माझा मित्र राजेश अहिरे दोघी बायिक ने हरिहर जायला सकाळी ९ ला निघालो . माझ्यासोबत अजून १ मित्र दीपक भाऊ येणार होते ,आम्ही निरगुडपाडा हे पायथ्याशी असलेले गाव आहे तेथून आपण हरिहर आणि भास्कर गडासाठी जाऊ शकतो .
नाशिक रोड वरून बाहेर पडलो आणि त्रंबकेश्वर ला जाणार्या रोड ने प्रवास सुरु झाला . थंडी कडाक्याची होती. वाटेत थोडे पुढे आल्यावर लगेच अंजनेरी किल्ला रस्त्याच्या डाव्या बाजूस नजरेस पडतो . १ तासाच्या प्रवासानंतर आम्ही हरिहर च्या पायथ्याशी असलेल्या पाड्यावर येउन पोचलो,त्याचे नाव कोटमपाडा . माझे मित्र दीपक तिकडे लगेचच पोचले . तिथे असलेल्या १ झोपडीत आम्ही आमच्या गाड्या लावल्या अन खरा हरिहर चा प्रवास चालू झाला . वातेच जात असताना भात शेती दिसून येत होती ,इथल्या आदिवासी लोकांचे उतपन्नाचे हे प्रमुख साधन . अगदी साधी आणि सरळ जीवनशैली . थोडा वेळ लहानपणी मामच्या गावी काढलेले दिवस आठवू लागले . थोडे वर चढाई केल्यावर हरिहर समोर दिसून पडला ,लगेचच मी माझा कॅमेरा काढला अन केली हरिहर ला कॅमेर्यात साठवायला सुरवात ,मी माझ सर्वस्व विसरून गेलो . वर चढाई करत असतांना दीपक त्याचे हरिहर चे वेग वेगळे किस्से सांगत होता ,त्याची हि हरिहर ची ५वी वेळ होती . मी सगळे ऐकत होतो आणि उत्तुकता शिगेला पोचली होती

शेवटी आम्ही पोचलो हरिहर च्या पायथ्याशी कातळात कोरलेल्या हरिहर च्या पायर्या च्या मी अगदी प्रेमात पडलो होतो , कधी एकदाचा वर पायर्या चढून जाणार असे झाले होते ,तत्पूर्वी मी माझ्या कॅमेर्यात त्या पायर्याना साठवत होतो . अगदी सरळ आणि उभ्या दिसणाऱ्या त्या पायर्या पाहून मनात धडकी सुद्धा भरली होती . शिवनामाचा जयघोष करून पायर्या चढायला सुरुवात केली न काही वेळातच वर प्रवेश द्वाराजवळ जाऊन पोचलो . मागे वळून बघतच नजरा काही वेगळाच होता . लगेचच आम्ही पुढे जाऊन परत ३०-४० उभ्या पायर्या अन भयानक अश्या वाटणाऱ्या पायर्या दिसल्या , त्या चढायला एकदम हळू सुरुवात केली ,मागे वळून बघतच चक्कर येईल असे भयंकर असे दृश्य दिसत होते . शेवटी वर पोचलो , हरिहर वर बनविलेया पाण्याच्या टाक्या अन तलाव दिसून आला ,त्यात थंड पाणी होते . पुढे थोडे सरकल्यावर लगेचच समोर घुमटाकार माथा असलेली दगडी ३० फूट लांब व १२ फूटरुंद अशी दगडी कोठी दिसली.. कोठीचे  प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख होता.. इतिहास काळातील हीदारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव शाबूत असलेली इमारत आहे. जोरात भूक लागली होती तिकडेच आम्ही जेवणावर ताव मारला आणि अर्धा तास विश्रांती केली . सुखाचा परमोच्च आनंद काय असतो याची अनुभूती येत होती . दुपारचे ३ वाजले होते तरी थंडगार वारा वाहत होता .
हरिहर चा उंच माथा ज्याला आपण बालेकिल्ला म्हणू शकतो तो आम्ही शेवटी चढलो आणि तिथून दिसणारा नयनरम्य दृश्य मी या आधी कधीच पहिले नवतो ,मी स्तब्ध होऊन दूरपर्यंत जाईल तिकडे नजर टाकण्याचा प्रयत्न करत होतो . थंडगार हवा आणि अथांग असा सह्याद्री डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न मी करत होतो . शेवटी आम्ही १ तास तिथे घालविला ,इच्छा नसताना सुद्धा आम्हाला परतावे लागले कारण अंधार पडत होता आणि आम्हाला पायथ्याशी परत जाऊन नाशिक साठी निघायचे होते . शेवटी जड अंतकरणाने आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली ,त्या हरिहर च्या पायर्या अगदी काळजीपूर्वक खाली उतरत होतो अन उतरत असताना मावळतीचा सूर्य हा दिसून येत होता . १ तासात आम्ही खाली पायथ्याशी आलो . अन परत हरिहर कडे बघून आम्ही परतीचा प्रवास चालू केला . पण माझे मन अजूनही हरिहर वर भटकत आहे अन मी हरिहर च्या प्रेमात कायमचा पडलो आहे
 किल्ल्याची सविस्तर माहिती खाली देत आहे .

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग     डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक     श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.

नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.


पहाण्याची ठिकाणे :
कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे.

पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला ५ पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते.

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
हर्षेवाडी मार्गे १ तास तर निरगुडपाडा मार्गे २ तास लागतात.

इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.





युवा

विषय - युवा
२०२० पर्यंत महासत्ता बनायचे स्वप्न आपण सगळ्यांनीच बघितले आहे .  आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्वाची भूकिका कुणाची असेल तर भारतातल्या युवा पिढी ची . आज जगात सगळ्यात जास्त युवा कुठे असेल तर तो आपल्या देशात आहे . आपल्या देशाला जो इतिहास आणि संस्कृती लाभली आहे ती जगातल्या कुठल्याच देशाला लाभली नाही .
पण  जर का विचार केला तर ज्या युवापिढी च्या जोरावर आपण महासत्ता बनायचे स्वप्न बघत आहोत तर असे वाटते कि हे स्वप्न पूर्णे होणे  इतक्यात तरी शक्य दिसत नाही . याचे कारण सुद्धा हा आजचा युवा आहे .
काही क्वचित युवा वगळता यांना ना देशाबद्दल अभिमान ना इतिहासाची जाण ना महापुरुषांचा अभिमान उरलाय . यांना इतिहास माहिती नाही , महापुरुषांनि दिलेलं योगदान माहित नाही . किती हाल अपेष्ट सहन करून मिळवलेला स्वतंत्र संग्राम माहित नाही . आजचा बहुतांश युवा फक्त मौज मजा मस्ती आणि चंगळ करण्यात आपला बहुतौंश वेळ वाया घालवीत आहे . तो व्यसनाधीन झाला आहे , ज्या वयात त्याने शरीर कमावले पाहिजे त्या वयात तो आपले आयुष्य धुम्रपान , मद्यपान , घुटका खाऊन  ते आयुष्य नष्ट करायला निघाला आहे . तो मान सन्मान , सामाजिक बांधिलकी , मानवता या सगळ्यांपासून दूर निघून गेलेला आहे . आणि हा आपल्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
रेव पार्टी , drugs , अमली पदार्थांचे सेवन या सारख्या आयुष्य बरबाद करणाऱ्या सवयी त्याने त्याने स्वतः ला लावून ,त्यापासून सुटका करणे त्याच्यासाठी खूप कठीण होऊन बसले आहे . अशी सगळी भयानक आणि वास्तविक परिस्थिती असताना महासत्ता होण्याचे आपले स्वप्न मनातच राहून जाईल कि काय असे वाटू लागले आहे .
अश्या ह्या भारतीय युवा वर्गाला मार्गदर्शनाची गरज आणि वास्तविकतेची जाणीव करून देणे गरजेचे आहे , जेणेकरून तो या सर्व व्यसनांपासून दूर राहील आणि आपल्याला मिळालेल्या अमुल्य आयुष्याचे काहीतरी चागले काम करून सार्थक करेल, सोबतच आपल्याला आपल्या समाजाला काहीतरी देन लाभते म्हणून तो काहीतरी सामाजिक कार्य सुद्धा करेल अशी आशा आहे .
आपलाच
अमोल देशमुख

खांदेरी उंदेरी जलदुर्ग भ्रमंती






रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर असलेल्या किल्ल्यांपैकी जोडी म्हणजे खांदेरी उंदेरी जलदुर्ग . 
मजबूत तटबंदी असलेले शेकडो वर्ष उलटून देखील दिमाखात उभे असलेले जलदुर्ग म्हणजे हे दोन साथीदार . या किल्ल्याचे वैशिष्ट म्हणजे यांची बुलंद तटबंदी जी समुद्राच्या लाटांना दिवस रात्र तोंड देत आहे आणि या दोन्ही किल्ल्यांवर असलेल्या तोफा ज्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत . 
२ दिवस मिळालेल्या सुट्टीचा फायदा भटकंती साठी घ्यायचा हे आधीपासूनच मनात होत, पण जलदुर्ग करायची इच्चा जे दुर्मिळ आहेत म्हणून खांदेरी उंदेरी ची निवड केली. बर्याच दिवसांनी हा योगायोग जुळून आला . थेट मुंबई गाठली रविवार सकाळीच निघायचे ठरवले . दोन्ही किल्ले करायचे असल्यास १ दिवस पुरेसा असतो पण त्यासाठी तुम्ही आधी मुंबई मध्ये १ दिवस आधीच असायला हवे. 
मी आणि माझे मुंबई चे २ मित्र जितेंद्र दांडगे आणि अनिल गाढे सोबत होते . सकाळीच गेट वे ला पोहचलो, तिथून अलिबाग साठी बोट ने निघालो, जवळपास १ तासाच्या समुद्र प्रवासानंतर आम्ही मुधवा ला येउन पोहचलो, तेथून अलिबाग साठी जाण्याऱ्या बस मध्ये जाऊन थळ फाट्याला उतरलो. खांदेरी उंदेरी ला जाण्यासाठी आधी थळ गावात जावे लागते जे समुद्र किनार पट्टीवर आहे. थळ फाट्यावरून गावात बाजारपेठ ला यावे लागते. गावातील मासेमारी करणारे त्यांच्या बोटीने किल्ल्यांसाठी घेऊन जातात पण त्यासाठी आधी बुकिंग आवश्यक असते, वेळेवर जरी गेलात तरी कुणी तरी भेटून जाते पण ते पैसे खूप सांगतात . खांदेरी उंदेरी ला मोठा ग्रुप करूनच गेलेले बरे. आम्ही तीनच मित्र असल्याकारणाने आम्हाला १८०० रु द्यावे लागले. दोन्ही किल्ले फिरायचे ठरले, जास्त वेळ वाया  न घालवता आमचा प्रवास सुरु झाला. 
काही गोष्टी खांदेरी उंदेरी ला जातांना लक्ष्यात घ्याव्या लागतात त्या म्हणजे किल्ल्यांवर पिण्याचे पाणी नाही आणि जेवणाचा व्यवस्था सुद्धा तुम्हाला स्वतः करावी लागते. खांदेरी उंदेरी जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे पावसाळा सोडला तर कधीही जाऊ शकता. त्यातल्या त्यात उंदेरी किल्ल्यावर जायचे असल्यास भारती ओहोटी च्या वेळा पालव्या लागतात,कारण उंदेरी वर किल्ल्याच्या चारही बाजूंनी खडक आहेत बोट तिकडे थांबविता येत नाहीत म्हणून समुद्रात ओहोटी च्या वेळेत उंदेरी नीट बघता येतो . 
वाटेत थोड समुद्रात मध्ये गेल्यावर नजरेस पडतो तो उंदेरी किल्ला, त्याची तटबंदी पाहूनच त्या किल्ल्याच्या भक्कमतेचि प्रचीती येते. आम्ही आधी खांदेरी ला जायचे ठरवले . उंदेरी पासून थोड पुढे सरकल्यावर खांदेरी किल्ला दिसून येतो, याची तटबंदी सुद्धा तेवढीच बुलंद आणि भक्कम. ४० मिनिटांच्या प्रवास करून आम्ही खांदेरी ला पोहचलो. उतरताच आधी दिसून येतो तो किल्ल्याचा नकाशा , आधी नकाशा बघून आम्ही पूर्ण किल्ला चारही बाजूंनी बघायचे ठरवले. किल्ल्यावर बरेच शे ठिकाण बघण्यासारखे आहेत , सुरवातीलाच वेताळाचे मंदिर लागते आत गेल्यावर तिथे १ शिळा लागते ती मोठी होत जाते असे थळ येथील गावकार्याचे श्रद्धा आहे . होळीच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो , गावकरी येथे आपला नवस फेडायला येतात . 
 डावीकडे असणाऱ्या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांमध्ये हा मध्यम आकाराच खडक दिसतो. छोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्ष भांड्यावर ठोकल्या सारखा आवाज येतो. धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे. ते मागे टाकून दिपगृहाच्या बाजूने पुढे जातांना बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. वर पोहचल्यावर आपल्याला दिसते ती गाड्यांवर ठेवलेली तोफ. ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थित आहे. अशाच दोन तोफा लहान टेकडीच्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर आहेत. १८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी. उंचीचे असून षट्कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची लागते. दिपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो. दिपगृहाच्या बाजूला तटबंदीवरजिथे हेलिपॅड आहे. तिथेच खाली एक दरवाजा आहे. हादरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो. येथून बाहेर पडल्याअर कडेकडेने चालतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांनी कल्पना येते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपति मारुति चे अलिकडे बांधलेले मंदिरे पण आहे. किल्ल्यावर पाण्याचे टाकेसुद्धा आहे. वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीमध्ये एक द्वार आहे. तिथेच एक छोटी खोली आहे.
संपूर्ण किल्ला फिरून झाल्यावर १ गोष्ट मनाला हेलावून टाकणारी होती , किल्ल्यावर असलेल्या दारूच्या बाटल्या आणि पर्यटकांनी केलेला कचरा . 
थोडा वेळ दीपगृहाच्या खाली विश्रांती केल्यावर आम्ही परतीसाठी निघालो, थोडा वेळ बसून अथांग समुद्र दिसून येत होता नंतर उत्सुकता लागून होती ती उंदेरी किल्ल्याची  पण भरतीची वेळ असल्याने तिथे आमची बोट थांबून उतरणे शक्य नवते तरी उंदेरी च्या चारही बाजूंनी बोट फिरवून आम्ही मनसोक्त दर्शन घेतले. किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत दिसून येत होती . किल्ल्याच्या जवळून गेल्यास तिथे ठेवलेल्या तोफ दिसून येतात . शेवटी बराच वेळ झाला होता, उशीर झाला होता, तेथून थळ गावात परत येत असताना दोन्ही जलदुर्ग डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो , थळ  ला पोहचल्यावर गावकर्यांशी थोड्या गप्पा झाल्यावर गावकरी अभिमानाने सांगतात कि हे दोन्ही किल्ले म्हणजे आमची शान आहे. या किल्ल्यान्मुलेच आमची खरी ओळख आहे, अखेरीस गावकर्यांचा निरोप घेऊन मुंबई परतीचा प्रवास सुरु झाला. पण खांदेरी उंदेरी आणि थळ च्या आठवणी कायम स्मरणात राहतील हे नक्कीच .