Wednesday, June 3, 2015

युवा

विषय - युवा
२०२० पर्यंत महासत्ता बनायचे स्वप्न आपण सगळ्यांनीच बघितले आहे .  आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्वाची भूकिका कुणाची असेल तर भारतातल्या युवा पिढी ची . आज जगात सगळ्यात जास्त युवा कुठे असेल तर तो आपल्या देशात आहे . आपल्या देशाला जो इतिहास आणि संस्कृती लाभली आहे ती जगातल्या कुठल्याच देशाला लाभली नाही .
पण  जर का विचार केला तर ज्या युवापिढी च्या जोरावर आपण महासत्ता बनायचे स्वप्न बघत आहोत तर असे वाटते कि हे स्वप्न पूर्णे होणे  इतक्यात तरी शक्य दिसत नाही . याचे कारण सुद्धा हा आजचा युवा आहे .
काही क्वचित युवा वगळता यांना ना देशाबद्दल अभिमान ना इतिहासाची जाण ना महापुरुषांचा अभिमान उरलाय . यांना इतिहास माहिती नाही , महापुरुषांनि दिलेलं योगदान माहित नाही . किती हाल अपेष्ट सहन करून मिळवलेला स्वतंत्र संग्राम माहित नाही . आजचा बहुतांश युवा फक्त मौज मजा मस्ती आणि चंगळ करण्यात आपला बहुतौंश वेळ वाया घालवीत आहे . तो व्यसनाधीन झाला आहे , ज्या वयात त्याने शरीर कमावले पाहिजे त्या वयात तो आपले आयुष्य धुम्रपान , मद्यपान , घुटका खाऊन  ते आयुष्य नष्ट करायला निघाला आहे . तो मान सन्मान , सामाजिक बांधिलकी , मानवता या सगळ्यांपासून दूर निघून गेलेला आहे . आणि हा आपल्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
रेव पार्टी , drugs , अमली पदार्थांचे सेवन या सारख्या आयुष्य बरबाद करणाऱ्या सवयी त्याने त्याने स्वतः ला लावून ,त्यापासून सुटका करणे त्याच्यासाठी खूप कठीण होऊन बसले आहे . अशी सगळी भयानक आणि वास्तविक परिस्थिती असताना महासत्ता होण्याचे आपले स्वप्न मनातच राहून जाईल कि काय असे वाटू लागले आहे .
अश्या ह्या भारतीय युवा वर्गाला मार्गदर्शनाची गरज आणि वास्तविकतेची जाणीव करून देणे गरजेचे आहे , जेणेकरून तो या सर्व व्यसनांपासून दूर राहील आणि आपल्याला मिळालेल्या अमुल्य आयुष्याचे काहीतरी चागले काम करून सार्थक करेल, सोबतच आपल्याला आपल्या समाजाला काहीतरी देन लाभते म्हणून तो काहीतरी सामाजिक कार्य सुद्धा करेल अशी आशा आहे .
आपलाच
अमोल देशमुख

No comments:

Post a Comment