Monday, December 1, 2014

सह्याद्री स्वच्चता अभियान-भास्करगड













निमित्त होते दर वर्षी प्रमाणे आमच्या गडवाट संस्था ( परिवारा ) तर्फे आयोजित सह्याद्री स्वच्चता अभियान २०१४ चे . त्या अंतर्गत महाराष्ट्रातील निवडक किल्ले ज्यांवर लोकांचा नेहमी राबता असतो अशे किल्ले निवडण्यात आले होते.आणि अश्या किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवायची होती .  त्या अंतर्गत नासिक विभागातर्फे भास्कर गड निवडण्यात आला . जळगाव वरून जाणारा मी एकटाच होतो . जायचे नियोजन आधीपासून केल होत . २३ नोव्हेंबर ला मोहीम करायचे ठरविले होते . मी जळगाव वरून २२ लाच रात्री निघालो आणि मुक्काम करायचे ठरविले. २३ ला सकाळीच सगळे नाशिक - त्रंबक रोड ला ७ ला जमणार होतो पण मोहिमेसाठी यंदा काही नवीन महिला- मुली येणार होत्या म्हणून जमत जमत सगळे ८. ३० वाजलेत . आमचे मित्र ईश्वर सहाणे आणि दीपक खातडे गावावरून परस्पर येणार होते . ईश्वर सहाणे हे म्हणजे चालते बोलते इतिहासकार . कोणते हि गड किल्ले असोत किवा इतिहास असो त्यांच्याकडे सगडी माहिती तुम्हाला मिळणार अगदी google च्याही पलीकडे .
सकाळच्या बोचर्या थंडीत आणि धुक्यात bike ने आम्ही भास्कर गडावर जायला निघालो . नाशिक च्या भाहेर पडताच त्रंबक च्या डोंगरांगा चालू झाल्या . सगळ्यात आधी दिसतो तो  तो किल्ले अंजनेरी . ज्या किल्ल्यावर हनुमान जन्मले असे म्हटले म्हटले जाते . नंतर अखेरीस आम्ही भास्कर गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी येउन पोहचलो . आमचे सहकारी ईश्वर दादा आणि दीपक भाऊ तिकडे तिकडे केवाचेच येउन बसले होते . आम्ही गाड्या पायथ्याशी लाऊन आमचा प्रवास चालू केला . भलामोठा भास्कर गड वर बघितल्यावर दिसून पडत होता . सहजच किल्ला सर होईल असे वाटत होते  जसजसे वर चढत गेलो तसतशी किल्ल्याची वाट दमछाक करणारी होती . वाटेत ३ ते ४ वेळा थांबून आम्हाला ३ तासानंतर भास्कर गडाचा बुरुज दिसून आला तेवा जाऊन आतापर्यंतचा आलेला सगळा थकवा अगदी क्षणात निघून गेला . पण थोडे पुढे गेल्यावर कळले कि अजून किल्ल्यावर जाण्यासाठी आमाला त्या बुरुजाला डोंगराच्या कडेने वळसा घालून जायचे होते म्हणजे अजून ४० ते ४५ मिनिट लागणार होते . पुढे गडाच्या खालून जाणारी वाट अन वाटेत लागणारा गार वारा सुखद अनुभव देऊन गेला. पुढे सरकत असताना डावीकडे खडकात कोरलेल्या २-३ गुहा दिसून आल्या आणि उजवीकडे दिसून येत होता तो भलामोठा फनीचा डोंगर . शेवटी ४ तासांच्या दमलेल्या चढाई नंतर आम्हाला गडाच्या अखंड दगडी कोरलेल्या पायर्या दिसून आल्या अन मग कुठे माझ्या जीवात जीव आला .
आमच्या सोबत असलेल्या बच्चे कंपनी ट्रेक चा पुरेपूर आनंद घेत होती . वर पायर्या चढून झाल्यावर दिसून आला तो किल्ल्याचा प्रवेशद्वार . पावसाच्या पाण्यामुळे बराचसा भाग बुजून गेलेला होता तरी त्याच्यावर केलेले कोरीव काम अगदी थडक पणे  दिसून येत होते . वर गेल्यावर स्वर्गात पोहोचल्याची अनुभूती येत होती . समोर हरिहर किल्ला , डाव्या बाजूस फनीचा डोंगर आणि उजव्या बाजूस त्रंबक च्या डोंगर रांगा दिसून पडत होत्या . सगळे सगळे क्षण मी माझ्या कॅमेर्यात टिपत होती . मेमोरी सुद्धा फुल झाली शेवटी .  मग नंतर आम्ही गडावर १ झाडाखाली बसून जेवणावर ताव मारला . दुपारचे २ वाजले होते . जेवण झाल्यावर सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला आणि नंतर मग आम्ही आमच्या स्वच्छता अभियानास सुरुवात केली . गडावर कचरा तसा फारच कमी होता कारण हा गड तसा फारच दुर्गम . शेवटी वेळ आली ती परतायची . उतरायच्या आधी आम्ही सगळ्यानी गारद ( शिवनामाचा जयघोष ) देऊन खाली उतरायला सुरुवात केली . उतरत असताना वाटेत दिसणारा कचरा आम्ही गोळा करत होतो . सोबत आणलेले पाणी जवळपास संपले होते . संध्याकाळचे ५ वाजेला परत आम्ही पायथ्याला येउन पोहचलो .

किल्ल्याचा इतिहास आणि पाहण्याची ठिकाणे खाली दिल्याप्रमाणे



किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

Bhaskargad (Busgad)

Bhaskargad

Bhaskargad
इतिहास :
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.
इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
पहाण्याची ठिकाणे :
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्‍या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्‍यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.
प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

No comments:

Post a Comment