भंडारदरा - महाराष्ट्रातील स्वर्ग अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.पश्चिम घाटाचा हा परिसर आणि त्याच सौदर्य अमाप आहे. महाराष्ट्राला हि मोठी निसर्गाने दिलेली देणगीच म्हणता येईल.
भंडारदरा परिसर जरी निसर्गसंपन्न असला तरी विकासाच्या दृष्टीने अजूनही मागेच आहे.इथे राहणारे आदिवासी आणि इतर बांधव अजूनही मुळ गराजांपासून वंचित.तरीदेखील हि लोक इथे एकदम सुखात राहतात.यांचं मुख्य उत्पन्न म्हणजे भात याला कारण एकच इथे पडणारा पाऊस.
पावसाचा काहीं काळ सोडला तर बाकी इतर महिने यांच्यासाठी कठीण असतात.सध्या पुण्या मुंबई वरून विकेंड ला येनर्याचा ओघ इकडे बराच वाढलाय आणि त्याचाच फायदा घेत इथे २-४ पैसे हे लोक पावसाळी पर्यटनातून कमावतात.
हा फोटो म्हणजे भंडारदरा परिसरातील एका शेतात राखण करणाऱ्या मुलीचा.मागे दिसणारा भंडारदरा जलाशय.
मुलीच्या कपड्यावरून कल्पना करता येईल की शाळेचा गणवेश . हाच दिवसभर घालून दिवस काढायचा.
शहरी लोकांसारखे दिवसातून २-३ ड्रेस सकाळ संध्याकाळ रात्र या प्रमाणे यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात.म्हणून आहे त्यात ही लोक आनंद मानतात.
अठरा विश्व दारिद्र्य असूनदेखील चेहऱ्यावरील हास्य कमी होऊ न देणारी हि लोक कोरोना सारख्या कठीण काळात जगण्याची ऊर्जा देऊन जातात.
आयुष्य सुंदर आहे ☺️
फोटो साभार - ऋषिकेश जाधव

No comments:
Post a Comment